नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

ऑफिस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऑफिस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

एकटा जीव सदाशिव - भाग २





एकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या.  मी खरेदीला सुद्धा एकटा जातो.  खरेदीचेही खूप किस्से आहेत.  कॉलेजच्या काळात दुर्दैवाने (त्याच्या) माझ्याबरोबर दिवाळीच्या खरेदीला आलेल्या मित्राला मी असा तोंडघशी पाडलेला की त्याने आजतागायत खरेदी हा शब्द माझ्यासमोर काढला नाही.  घ्यायचं काय तर एक टी शर्ट.  मला पसंतच येईना कुठला.  आलाच पसंत तर मापाचा मिळेना. सुरूवातीला तो "चल सोड दुसरीकडे पाहू" असा उत्साही.  नंतर नंतर "ते काय वाईट होतं" "तुला नक्की घ्यायचं नं"  " पुढच्या आठवड्यात येऊया  यार साडेदहा वाजले घड्याळ्यात" असा कुरकुरायला लागला.  तीन तास फिरून स्टेशनच्या मेन मार्केटपासून बर्‍याच लांब शेवटी माझ्या पसंतीचं टी शर्ट मिळालं.  ते मी बरीच वर्ष वापरलं.  माझं आवडतं टी शर्ट होतं ते.  अजूनही आहे खणात.  नायलॉनचं असल्याने त्याचं पायपुसणं झालं नाही.  काय एक एक नशिब घेऊन येतं टी शर्ट.  

जरा मध्ये मध्ये विषयाचं नाव वाचायला लागतं.  काय आमची नाव एकदम भरधाव वहावत जाते कुठेही भरकटते.  लोकांच्या सहनशक्तीचा वेळीअवेळी अंत पाहून लोककल्याणास्तव मी एकटं  खरेदीला जायला लागलो.  लागते कशाला सोबत मला कळत नाही.  एकटं जावं मस्त खरेदीला पसंत पडेल ते पसंत पडेल तिथनं उचलावं "हे?"  "इथनं!!" असं खवचटपणे विचारणारं कुणी नसतं.  किंवा "हे घे"  "मी तिथनंच घेतो" "FS ला अर्ध्यात पडला असता सेम" असे सल्ले देणारं कुणी नसतं.  होतं काय की सोबतचा तशी मदतच करत असतो पण कधी कधी त्याने बाजूला शॉर्टलिस्ट केलेले तीन चार आपण शॉर्टलिस्टलेले चार पाच यातनं नेमकं काय निवडावंचा पुरता गोंधळ उडतो मग राहू दे तिच्याआयला मग कधी तरी घेऊ म्हणायची वेळ येते. ही दिव्य पार करूनही काही निवडलत तरी होणार्‍या समाधानाची कधी कधी काशी होते, म्हणजे "एश है  बाबा, शौक बडी चीझ है"  "मोठ्या बापाचा"  "प्याकेज किती भेटतो"  " तुमच्या त्या जागेचं भाडं किती येतं?" असलं काही कॅश काउंटरच्या रांगेत ऐकावं लागत नाही.  तुम्हालाही "कॉर्पोरेट डिसकाउंट मिलेगा ना यही के ग्रूप का एम्प्लोई हय मय"   "फटेगा तो ? निस्ता मुंडी मत हलवो वापस लेके आयेंगा काय समजलास?"   "मग काय फायदा दोन घेऊन"    "लाश्टका फायनल बोलो"   "साले थोडा तो कम कर रिक्षा का छुटे"    "इतनाही है जेब चेक कर" असं काहीही बोलून घासाघीस करायला काहीही वाटत नाही. मागे वुडलॅंड च्या शोरूम मध्ये मी  "अरे ओरिजिनल है ना?" असं विचारलं होतं.      

माझी हापिसातली मैत्रिण म्हणाली की मोठमोठे लेखक लोक गप्पिष्ट असतात.  त्यांना संवादाची भूक असते. त्यातून त्यांना कॅरेक्टर्स मिळत जातात. मी म्हटलं पहिली गोष्ट मी लेखक वगैरे नाही हौशी ब्लॉगर आहे फक्त (ओर ये लगा सिक्सर.) आणि आपापल्या श्टायली असतात गो. एक अब्ज़र्वर राहूनही कॅरेक्टर्स मिळतात. मी तर म्हणतो एक वेळ बोलून इतका खुलणार नाही माणूस जितका गाफील असतांना खुलतो. म्हणून इज्जतवाडीमध्ये मुलाखत वगैरे घेतली तर डिप्लोमॅटिक बोलणारे स्टिंग ऑपरेशनात असते दृष्ट लागण्यासारखे खुलतात.     
        
प्रवासाचंच बघा.  एकटं दुकटं प्रवास करावा फोर्थ सीट पदरात पडायचे चान्सेस असतात.  मस्त पुस्तक काढून वाचा, गाणी ऐका, हिरवळ पहा, नाक कान साफ करा, भांग पाडा.  सुहाना सफर ओर ये मोसम हसी ( मुंबईत आहे यंदा, ४ करोडला पडला …  असो )    तर अगदी मनासारखा प्रवास करा.  नाही तर सोबत असतं कुणीतरी सीट रिकामी झाली की "तू बस नाही ओके तू बस, बस रे"  असं बसवाबसवी खेळता खेळता तिसराच तंगडं स्ट्रेच करून घुसून बसतो.  किंवा "तो पक्का नीच आहे, जाम डोक्यात गेला माझ्या "  "यावेळेचं अप्रेज़ल बोंबलणार बघ"    "मी तर सरळ केलं त्याला , सरळ सांगितलं बरोबर ना? तू बोल तुला काय वाटतं बोल "  काय घंटा बोल, तू तुझी इतकी लाल का करतो? आत्मचरित्र लिही ना सरळ  'स्वघोषित - लालबादशहा'  'सरळकर'  वगैरे नावाचं मला का पकवतो? एक तर हा पंखा चालत नाही तरी स्टेशन गणिक कोणीतरी त्याच्या पात्यात पेंनच घाल, फणीच घाल, पिन, कागदी सुरनळी,  विज़िटिंग कार्ड  सगळं घालून मला धुळीचा अभिषेक घालतो, आणि हॅ हॅ करत दात काढत मलाच "बंद है क्या?" विचारत खात्री करून घेतात. त्यात या सोबत्याचं "ते सोड  मी काय म्हणतो बर नाही केलं तेव्हा म … " सुरूच.  अरे क्व्याय. ऑफिस पॉलिटिक्स वगैरे कशाही वरून या रोतलूंचा डोक्याला निस्ता शॉट.  सकाळचं  एकवेळ ठीक आहे. पण संध्याकाळी हपिसचं रटाळ काम संपवून घरी एक कप चहापर्यंत पोहोचेपर्यंत एकटं सोडावं माणसाला.  मी एकटा नसतो.  अपना एक पंटर है. तो ऑफीस डिस्कशन नाही करत प्रवासात.  आम्ही मक्याचे दाणे खात माफक टिंगलटवाळ्या करत प्रवास करतो.  पण कधी कधी पंटरचापण कंटाळा येतो. कधी कधी स्वत:चापण.

          
क्रमश:                                                                               

रविवार, ३ जुलै, २०११

उडती बातें ...



माझ्याबद्दल दोन चार वाईटसाईट गोष्टी ऑफिसातल्या मित्राने (?) सांगितल्या तेव्हाचा संवाद -
"अच्छा? कौन बोला? मतलब तुम्हे कैसे पता चला?"
"नही .. ऐसेही उडतेउडते"
"देखो भैया हवा मे कई सारी बाते होती है, अब जो बात खुदके बलबुतेपे उड भी नही पाती, उडनेके लिए भी जिसे हवा का सहारा लेना पडता है भला उस बात को हम तवज्जू क्यो दे? चायसिगरेट के साथ लोग कई बाते करते है .. वही हवा मै .. उडतीउडती बातें .. देख कल एक और आंधी आएगी, बातों के पत्ते बिखर जाऐंगे, फीर बातें बातें रहे जाएंगी और आदमी आदमी"

बुधवार, १० जून, २००९

साधी माणसं

राजकारण हा माझा प्रांत नव्हे असं सगळेच म्हणतात. पण काहीजणांनी साळसूदपणाचा उसना आव आणून असं काही म्हटलं की यांना अजून तिकीट कसं मिळालं नाही याचं आश्चर्य वाटतं. आपल्या आजूबाजूला अशी बरीच संधीसाधू मंडळी असतात. डोळ्यासमोर येणारा प्रत्येक नवा चेहरा यांचा नवा मदतनीस असतो. बरेचदा यांची साधी तोंडओळख यांच्या गरजेनुसार मैत्रीत बदलते. बघावं तेव्हा साखर पेरतांना दिसतात. यांच कुठल्याच गोष्टीवर ठाम मत नसतं आणि कोणाशी मतभेदही नसतात. हे कुठल्याच गोष्टीचा निषेध करीत नाहीत, बंड पुकारीत नाहीत. शांत राहून आपण किती आदर्शवत (?) आहोत हे दाखवतात. म्हणजे म्हणाल तर तटस्थ भूमिका म्हणाल तर मूक पाठिंबा. यांची मस्केबाजी मैत्री, आदर, संस्कार यांच्या वेष्टनात इतक्या बेमालूमपणे गुंडाळलेली असते की आपल्याला गुंडाळलं जातय याची शंकाच कुणाला येणार नाही. कुठल्याच गोष्टीची सरळ, मुद्देसूद चर्चा यांना मान्य नसते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा गुंता तयार होतो. सगळे धागेदोरे माहित असूनही जाणीवपूर्वक गुंता सोडवला जात नाही. 'गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय यांचा मोकळा' असतो. यांचं आयुष्य म्हणजे योजनांची निव्वळ आखणी असते. यांच्यासाठी माणसं म्हणजे पायर्‍या ... दगडाच्या .... भावनाहीन, संवेदनाहीन. हे आपल्यासारखेच इतरांना समजतात. सगळी माणसे देवाने एकाच साच्यातून काढलीत असं यांच ठाम मत असतं. आपल्या संकुचित विचारांचा यांना अभिमान वाटतो, इतकच नव्हे तर सगळ्यांचे विचार असे असावेत असा त्यांचा अट्टाहास असतो. यांची यशाची व्याख्या म्हणजे साखर पेरण्यातील चातुर्य आणि त्या जीवावर मारलेल्या उड्या. अशी माणसं बघितल्यावर पटतं की आयुष्यात शिकण्यासारखं खूप आहे.